साप्ताहिक जऊळका एक्सप्रेस न्युज पोर्टल

संपादक:सारनाथ अवचार RNINO.MAHMAR/2017/72680

Monday, June 21, 2021

   शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत 

वाशीम :- शेतक-याने आपल्या शेताची मशागत करुन महाग मोलाची बियाणी  व खते आनुन शेताची पेरणी केली खरी  परंतु मागील काही दिवसापासुन पावसाने  उघडीप दिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाला  असुन अजुन काही दिवस पाउस  न आल्यास बळीराजा समोर पेरणी उलट्ण्याचे व दुबार पेरणी संकट उभे ठाकणार असल्याने तो पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाल्याचे चित्र जिल्हामध्ये पाहावयास मिळत आहे.


 


at June 21, 2021 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Friday, June 18, 2021

 

 विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.

वाशिम, दि. १७ (जिमाका) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला नसल्यास तातडीने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या सदस्य तथा उपायुक्त डॉ. सी. के. कुलाल यांनी कळविले आहे.

 

at June 18, 2021 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

 गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करणाऱ्यांवर होणार कारवाई

• अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविणार

• सहाय्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार


 वाशिम, दि. १८ (जिमाका): नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारे गैरमार्गाने अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांना अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.

 

केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्व समजावे, हा त्यामागील उद्देश आहे. ऑनलाईन प्रणालीचा वापर करताना पालकांनी त्यांच्या पाल्यास सदर परीक्षेचे महत्व पटवून द्यावे, तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही, याची जाणीव करून द्यावी.

 

लोकाभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून लर्निंग लायसन्स प्राप्त करणाऱ्या अर्जदाराची तपासणी करण्यात येवून गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास सहाय्य करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांचेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, श्रीमती सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच नागरिकांनी गैरप्रकार करून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले आहे.




 









 

 

 




at June 18, 2021 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, June 12, 2021

 

‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’ योजनेत सहभागी होण्याचे       जिल्हाधिकारी यांचे आवाहन

वाशिम, दि. ११ (जिमाका) : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. तरी वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

कोरोना रुग्ण संख्येमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्ग तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात होण्याचा धोका वर्तविला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड संबंधित चाचण्या होणे व गावातच संस्थात्मक विलगीकरण होणे आवश्यक आहे. गावातील सर्दी, ताप, खोकल, हगवण, डोकेदुखी, मधुमेह, अशक्तपणा, फुफ्फुसांचे आजार असणाऱ्या रुग्णांना तातडीने कोविड तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, येणाऱ्या काळात लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, तसेच पाण्याची सुविधा, शौचालय, पंख अशा सुविधा असलेल्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित करणे, अशा इमारतींमध्ये किमान १० बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

आपले कुटुंब, आपली गल्ली-मोहल्ला, वाडी-वस्ती, आपले गाव कोरोनामुक्त केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. गावागावांमध्ये कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, करोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल.

या निकषानुसार गुणांकनाबाबतचे स्वयंमुल्यांकन तयार करून १ महिन्याच्या कालावधीत संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. गट विकास अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या सर्व स्वयंमुल्यांकनाच्या प्रस्तावाची तपासणी करून सर्वाधिक गुण प्राप्त १० ग्रामपंचायतींची निवड करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रस्तावांचे गुणांकन करून सर्वाधिक गुण प्राप्त तीन गावांची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करतील. विभागीय आयुक्त स्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या विभागवार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची अंतिम निवड विभागीय आयुक्त करणार आहेत.

 


 

 

 

at June 12, 2021 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...

  • (no title)
      लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...
  • (no title)
    दिवाळी सणानिमित्त श्री शिवाजी विद्यालयाने पत्रकारांचा केला सत्कार       मालेगाव ता. प्र.सुरज अवचार   :- दिवाळी सणानिमित्त मालेगाव ता...

Search This Blog

  • Home

About Me

My photo
View my complete profile

Blog Archive

  • November 2021 (2)
  • August 2021 (1)
  • July 2021 (5)
  • June 2021 (8)
  • May 2021 (7)
  • April 2020 (4)
  • February 2020 (1)

Report Abuse

Contact Form 9765513927

Name

Email *

Message *

Followers

jaulkhaexpress.gn@gmqil.com

Name

Email *

Message *

Wikipedia

Search results

Search This Blog

Followers

Simple theme. Powered by Blogger.